Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the updraftplus domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/vishwasa/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Vishwa Sahyadri – Page 179 – पाऊल प्रगती चे … नव निर्मिती चे…
Home Blog Page 179

पिंपरीमध्ये इच्छुकांना आता सोसायट्यांची ‘चिंता’

पिंपरीमध्ये इच्छुकांना आता सोसायट्यांची ‘चिंता’<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिंपरी : महापालिका प्रभाग रचना अद्याप जाहीर झालेली नाही, निवडणुकीची तारीख निश्चित नाही, कोरोना व ओमिक्रॉनमुळे निवडणूक नियोजित वेळेत होईल की पुढे ढकलली जाईल, या बाबत अनिश्चितता आहे, असे असले तरी, इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विशेषतः बहुतांश इच्छुकांनी सोसायट्यांमधील मतदारांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसत आहे. कारण, सोसायटी स्तरांवर मेळावे, बैठकी, समस्या निवारण शिबिरे आयोजित केली जात आहेत.

गेल्या पाच वर्षांत शहराच्या विस्तारात मोठा बदल झाला आहे. २०१७ च्या निवडणुकीत शेती अथवा पडीक जमीन असलेल्या ठिकाणी आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. काही सोसायट्यांमध्ये एक हजारांवर मतदार आहेत. विशेषतः समाविष्ट गावांमध्ये ही स्थिती आहे. त्यामुळे तेथील मतदारांची संख्याही वाढलेली दिसते. त्यांना आकर्षित करण्यासाठी व त्यांचे मतदान मिळवण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू असलेला दिसतो.

ओबीसींचे आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका नकोत – सदाशिव खाडे

ओबीसींचे आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका नकोत – सदाशिव खाडे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिंपरी चिंचवड भाजपा ओबीसी मोर्चाची मागणी
पिंपरी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत आहे असा दिखावा केला. ओबीसी समाजाला केवळ मूर्ख बनविण्यासाठी हा अध्यादेश काढलेला होता. आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थगित कराव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चा आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा पिंपरी चिंचवड शहर भाजपा नेते व प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिला आहे.
या मागणीचे पत्र खाडे यांनी तहसीलदारांना नुकतेच दिले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख वीणा सोनवलकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव मनोज ब्राह्मणकर, ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश रासकर, युवक अध्यक्ष राजेश डोंगरे, सरचिटणीस कैलास सानप, योगेश अकुलवार, नेहुल कुदळे, शंकर लोंढे, जयश्री देशमाने, लता हिंदळेकर व किरण पाचपांडे आदी शहर भाजपा ओबीसी मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजाचे स्पष्ट मत आहे की, ओबीसी विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या या तीघाडी सरकारच्या अनागोंदी कारभारामुळेच अध्यादेशाला स्थगिती मिळालेली आहे. आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत महाराष्ट्रातील ओबीसी समाज गप्प बसणार नाही.’
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मागील २ वर्षांपासून ओबीसीचा इम्पेरीकल डेटा गोळा करण्याकरिता आयोग स्थापन केला. परंतु, आयोगाला कोणतेही आधिकार व आवश्यक ४५० कोटींच्या निधिची तरतूद केली नाही. त्यामुळे इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू झालेच नाही. परिणामी सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सरकारने काढलेल्या अध्यादेशाला स्थागिती दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार ओबीसींचा डेटा उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे घ्याव्यात. परंतु ओबीसी आरक्षित जागांवर निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी या पत्रात केली आहे.

World Inequality Report 2022: भारतात वाढतेय विषमतेची दरी

0
World Inequality Report 2022: भारतात वाढतेय विषमतेची दरी<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

देशातील वाढती गरिबी आणि उच्चभ्रू लोकांची वाढती संख्या यामुळे भारत जगातील सर्वात असमान देशांच्या श्रेणीत सामील झाला आहे. जागतिक विषमता अहवाल २०२२ (World Inequality Report 2022) मध्ये या गोष्टी समोर आल्या आहेत.

या अहवालानुसार, अहवालानुसार, भारतातील टॉप- १० टक्के श्रीमंत लोकांचे उत्पन्न भारताच्या एकूण उत्पन्नाच्या ५७ टक्के आहे. त्याच वेळी, टॉप- १ टक्के श्रीमंतांकडे देशाच्या एकूण उत्पन्नाच्या २२ टक्के वाटा आहे. एकूण उत्पन्नात तळाच्या-५० टक्के लोकांचे योगदान १३ टक्क्यांवर आले आहे. देशातील तरुणांचे वार्षिक सरासरी उत्पन्न २ लाख ४ हजार २०० रुपये आहे. यापैकी तळाच्या ५० टक्के लोकांचे सरासरी उत्पन्न ५३,६१० रुपये आहे, तर टॉप-१० टक्के तरुणांचे सरासरी उत्पन्न ११,६६,५२० रुपये आहे. हे सुमारे २० पट अधिक आहे.

जागतिक असमानता अहवाल २०२२ नुसार, सरकारने जारी केलेल्या असमानतेच्या डेटाच्या गुणवत्तेत गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, ज्यामुळे असमानतेतील बदल समजून घेण्यात खूप अडचणी येत आहेत. हा अहवाल प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ लुकास चॅन्सेल, थॉमस पिकेट्टी, इमॅन्युएल सेझ आणि गॅब्रिएल झुकमन यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांनी तयार केला आहे.

सार्वजनिक मालमत्तेत घट

अहवालानुसार, गेल्या अनेक दशकांपासून जगभरातील लोकांच्या संपत्तीत घट झाली आहे. शाळा, विद्यापीठे, रुग्णालये, सार्वजनिक इमारती आणि इतर सार्वजनिक सेवांसह सार्वजनिक मालमत्तेत घट झाली आहे. कोरोनाच्या काळात सार्वजनिक संपत्तीत घट झाली आहे, तर खासगी संपत्तीत वाढ झाली आहे. विशेषत: भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये श्रीमंत देशांच्या तुलनेत खासगी संपत्तीत वेगाने वाढ झाली आहे. १९८० च्या २९० टक्क्यांच्या तुलनेत २०२० मध्ये खाजगी संपत्तीमध्ये ५६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आर्थिक सुधारणांचा मोठा फायदा श्रीमंतांना

जागतिक विषमता अहवाल २०२२ च्या अहवालानुसार, ब्रिटिश राजवटीत १८५८ ते १९४७ या काळात भारतात विषमता जास्त होती. तेव्हा देशाच्या उत्पन्नापैकी ५० टक्के हिस्सा १० टक्के लोकांच्या ताब्यात होता. स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजनांमुळे ते ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत खाली आले. मात्र, नोटाबंदी आणि आर्थिक सुधारणांच्या निर्णयानंतर लोकांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे, त्याच बरोबर या विषमतेतही वाढ झाली आहे. अहवालानुसार, देशातील एक टक्का लोकांना या धोरणांचा सर्वाधिक फायदा झाला आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांच्या स्थितीत सुधारणा अत्यंत मंदावली असताना आणि त्यांच्यामध्ये गरिबी अजूनही कायम आहे.

एक टक्का श्रीमंतांकडे ३३ टक्के संपत्ती आहे

भारतातील सरासरी उत्पन्न ९,८३,०१० रुपये आहेत. तर तळाच्या १० टक्के लोकांचे उत्पन्न केवळ ६६,२८० रुपये आहे, म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या ६ टक्के. भारतातील मध्यमवर्गाचे सरासरी उत्पन्न ७,२३,९३० रुपये आहे. देशातील १० टक्के श्रीमंत लोकांकडे ६५ टक्के मालमत्ता असून त्यांची सरासरी ६३,५४,०७० रुपये आहे. तर देशातील १ टक्के श्रीमंत लोकांकडे ३३ टक्के संपत्ती म्हणजेच सरासरी ३,२४,४९,३६० आहेत.

सरकारे गरीब झाली

जागतिक विषमता अहवाल २०२२ मध्ये असेही म्हटले आहे की गेल्या ४० वर्षांत देश अधिक श्रीमंत झाले आहेत परंतु तेथील सरकारे अधिक गरीब झाली आहेत.

मोरया गोसावी मंदिर आणि परिसरात दीपोत्सव साजरा

मोरया गोसावी मंदिर आणि परिसरात दीपोत्सव साजरा<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संवेदना प्रतिष्ठानच्या वतीने श्री मोरया गोसावी मंदिर आणि परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी पणत्यांच्या दिव्यांबरोबरच आकर्षक  विद्युत रोषणाई करण्यात आली

पिंपरीतील रसायन कंपनीच्या गोदामास भीषण आग

पिंपरीतील रसायन कंपनीच्या गोदामास भीषण आग<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिंपरी, विश्व सह्याद्री ः पिंपरीतील कामगारनगर भागात असलेल्या इलंटास बेक इंडिया लिमिटेड या रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या गोदामास शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली.

या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मात्र, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हीआग लागली असूनही पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

‘पीएमपी’चा मार्ग जुन्नरपर्यंत वाढवा – आ. महेश लांडगे

‘पीएमपी’चा मार्ग जुन्नरपर्यंत वाढवा – आ. महेश लांडगे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिंपरी, विश्व सह्याद्री ःभोसरी ते जुन्नर या मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पीएमपीनवीन बस सेवा सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे यावर त्यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे. आमदार लांडगे यांच्या वतीने स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांनी निवेदन सुपूर्द केले.

या निवेदनात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हात स्वराज्याचे प्रतिक असलेले किल्ले शिवनेरी जुन्नरमध्ये आहे. आपल्या शहरातून अनेक पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक हे मंचर, जुन्नर व आंबेगाव या ठिकाणी नोकरी निमित्त ये-जा करतात, अनेक महिला व विद्यार्थीची संख्या हि मोठ्या प्रमाणावर आहे. या मार्गावर खाजगी वाहनातून प्रवास करणे महिलांना व विद्यार्थ्यांना जोखमीचे असून प्रवास करते वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

सध्या आपल्या विभागामार्फत मंचर पर्यंतच बससेवा उपलब्ध असून,पुढील प्रवास करताना इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. भोसरी हे ठिकाणाहून अनेक प्रवासी जुन्नर याठिकाणी जाण्यास उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या बसचे आर्थिक नुकसानही होणार नाही. त्यामुळे किल्ले शिवनेरी पायथ्यापर्यंत लवकरात लवकर यामार्गावर तात्काळ बससेवा सुरु करावी. तसेच राजगुरुनगर ते मंचर या मार्गावर सर्व ठिकाणी बसथांबावर बसस्टॉप बसवण्यात यावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

पिंपरीतील रसायन कंपनीच्या गोदामास भीषण आग

पिंपरीतील रसायन कंपनीच्या गोदामास भीषण आग<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिंपरी, विश्व सह्याद्री ः पिंपरीतील कामगारनगर भागात असलेल्या डाॕ. बेक या रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या गोदामास शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली.

या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मात्र, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हीआग लागली असूनही पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

प्रांताध्यक्षां समवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा

प्रांताध्यक्षां समवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिपंरी दि. १८,
काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ.श्री. नाना पटोले यांची आज सोमवारी मुंबई येथील निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिका-यांनी भेट घेतली. डॅा.कैलास कदम यांच्या काँग्रेस शहर अध्यक्ष पदीनिवडीबाबत शॅाल व पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले व पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला.

या वेळी पक्ष संघटनात्मक बांधणी व आगामी कामकाजाबाबत पटोले यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, चर्चेत नाना पटोले यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकी बाबत मार्गदर्शक सूचना दिल्या व शहरात काँग्रेस संघटना वाढीच्या ठळक बाबी व विशेष तंत्रे समजावून सांगितली व शहरात येऊन बैठक घेण्याबाबतची पदाधिका-यांची विनंती मान्य करत लवकरच शहरात येऊ असा विश्वास दिला.
या प्रसंगी कैलास कदम यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकीत उत्तम यश मिळविण्याबाबत ची तयारी व नियोजन याबाबत पटोले यांनी माहीती दिली.

या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेस चे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अमित मेश्राम व युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदि उपस्थित होते.

” इतके बेजाबदार सरकार पाहिले नाही ” शरद पवार त्यांची मोदी सरकारवर जळजळीत टीका

” इतके बेजाबदार सरकार पाहिले नाही ” शरद पवार त्यांची मोदी सरकारवर जळजळीत टीका<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिंपरी, (विश्व सह्याद्री ) : सरकारी यंत्रणांचा बेछूट गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारकडून केले जात असल्याचा गंभीर आरोप करत आपल्या चोपन्न वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत सूडाच्या राजकारणाने पेटलेले इतके बेजाबदार सरकार आपण पाहिले नसल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षानंतर शरद पवार दोन दिवसांच्या भेटीवर पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले. शनिवारी आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्ह्म्णाले, ‘केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी या विविध संस्थांना हाताशी धरून राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सत्ताधारी राजकीय नेते मंडळींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून महाविकस आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मला संसदीय राजकारणात ५४ वर्ष झाली. चन्द्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, व्ही. पी. सिह असे अनेक पंतप्रधान पाहिलेत; परंतु, सुडाचे राजकारण करून देशातील बिगर भाजप सरकारे अस्थिर करणारे इतके बेजाबदार सरकार आपण पहिले नाही.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, राजकीय नेते मंडळी यांच्यावर बेछूट खोटे आरोप करायचे मात्र, पुरावे नसतांना चौकशा सुरु करून दडपण आणायचे अशी भाजपची नीती आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे नाव न घेता पवार म्हणाले, ‘ एक पोलीस अधिकारी थेट गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसूल केल्याचा आरोप करतो. एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला. मात्र, ज्याने थेट न्यायालयात हे आरोप केले; तो पोलीस अधिकारच परांगदा होतो, हे केंद्र सरकारला माहित नसावे काय, याला काय म्हणावे ? पण, केंद्र सरकार, संबंधित अधिकारी भाजपची नेतेमंडळी हे संगनमताने करीत आहेत.’

राष्ट्रवादीचेप्रवक्ते नवाब मलिक यांचे जावयावर गांजाच्या तस्करीचा खोटा आरोप करून त्यांना सहा महिने जेलमध्ये डांबून ठेवले. आता, तो गांजा नसल्याचे न्यायालयानेच स्पष्ट केले. सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे लोक महाविकास आघाडीचे सरकार पडावे कट-कारस्थानं करीत आहेत. पण, आता या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील, तरी तिन्ही पक्ष खंबीरपणे एकत्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करीत असून सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असा मला ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

नवीन भोसरी रुग्णालयातील आयसीयू युनिटचे शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण

नवीन भोसरी रुग्णालयातील आयसीयू युनिटचे शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिंपरी : महापालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या.

खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती नितीन लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसेवक अजीत गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेट्टी, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे आदी उपस्थित होते.

कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड लॉकर, १ हाई पॉवर एक्सरे मशीन, १ सोनोग्राफी मशीन, २ बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, १वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे २ कोटी ५० लाखाची साहीत्य सी एस आर फंडातून सुपुर्द करण्यात आले. सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.