Home Lifestyle भवताल-उत्सव पर्यावरणाचा फेस्टिवल उत्साहात संपन्न

भवताल-उत्सव पर्यावरणाचा फेस्टिवल उत्साहात संपन्न

0
भवताल-उत्सव पर्यावरणाचा फेस्टिवल उत्साहात संपन्न

पुणे : भवताल चा हा शाश्वत महोत्सव प्रत्येक सहभागीला एक जबाबदार बनवण्याचा उपक्रम होता. या उपक्रमामधून प्रत्येकाला ठराविक पद्धतीने जगण्याच्या चौकटीतून बाहेर पडण्याचा आणि पर्यावरणाशी विचारपूर्वक वागण्याचा संदेश मिळाला आहे. सस्टेनेबल टुरिझम मुळे पर्यटकांना आठवण होत आहे की त्यांचे सुट्टीचे ठिकाण हे प्रकृतीतील अनेकांचे घर आहे.

भवताल फेस्टिवल पानशेत येथे उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला. राज्यसभा खासदार, निवृत्त मुख्य संपादक लोकसत्ता, म.टा., लोकमत असणारे कुमार केतकर सर यांच्या हस्ते भवताल फेस्टिवलचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अभिजीत घोरपडे (पर्यावरण तज्ञ, फाउंडर-संस्थापक भवताल), डॉ.जयंत गाडगीळ (शास्तज्ञ), उदय गुजर (फाउंडर, वनराई फाउंडेशन) व इतर सर्व तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन सर्व सहभागीना भेटले.

भवताल फेस्टिवल मध्ये विविध उपक्रम आयोजित केले होते.

सीडबॉल्स

‘सीडबॉल्स’ तयार करण्यासाठी माती, शेण, खत व देशी बियाणे वापरण्यात आले होते. जमिनीतली पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे. याचसाठी भवताल फेस्टिवल मध्ये सहभागी लोकांनी बिजांचे गोळे तयार करून ते आसपासच्या परिसरात फेकले, त्यामुळे त्यांना आनंद, मजा मिळाली आणि पर्यावरण पूरक कार्य हातून घडले.

टाकाऊतून टिकाऊ

कच‍ऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणा‍‍ऱ्या समस्या रोखण्यासाठी आपण आपल्या घरातूनही हातभार लावू शकतो. आपल्या घरात निर्माण होणा‍‍ऱ्या कच‍ऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकू शकतो. त्यामुळे कच‍ऱ्यात जाणा‍ऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल. याप्रकारची संकल्पना भवताल फेस्टिवल मध्ये राबविण्यात आली.

सापशिडी : एंटरटेंमेंट वुइथ इन्फोरमेशन 

मुलांनी फेस्टिवल मध्ये सापशिडी खेळ खेळताना मनोरंजनासोबत विषारी साप, बिनविषारी साप, घ्यावयाची काळजी अशी सखोल माहिती जाणून घेतली.

रॉक डायवर्सिटी

विविध खडकांबद्दल सखोल माहिती तज्ञाकडून सहभागींना देण्यात आली

“बांबू “ हा बहुवर्षीय वनस्पती नेहमी सर्वांना संदेश देत असतो की, कितीही उंच वाढला तरी जमिनीला नतमस्तक होता आलं पाहिजे!
आणि या जीवनातल्या सत्याप्रमाणेच वागणारी भवताल फेस्टिवल मधील सर्व तज्ञ लोक होते.