पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळून 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इंदापूर, पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर या तालुक्यातील शाळांना सुट्टी नसणार आहे. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पुढच्या 48 तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातही एक दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता जिल्ह्यातील काही तालुक्यांत तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.