Home Maharashtra Special नाट्यसंमेलनातील गैरसोयीबद्दल रंगकर्मींची नाराजी; राजकारणासाठी वापर होत असल्याचा सूर

नाट्यसंमेलनातील गैरसोयीबद्दल रंगकर्मींची नाराजी; राजकारणासाठी वापर होत असल्याचा सूर

0
नाट्यसंमेलनातील गैरसोयीबद्दल रंगकर्मींची नाराजी; राजकारणासाठी वापर होत असल्याचा सूर

पिंपरी :  100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा  शुभारंभ पार पडला असून या कार्यक्रमाला अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. पण 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात कलाकारांची गैरसोय झालेली पाहायला मिळाली आहे. अनेक कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ कलाकारांची गैरसोय

नाट्यसंमेनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर म्हणाल्या,”नाट्यसंमेलनात सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ कलाकारांनाही बसायला जागा मिळत नसल्याने उभं राहावं लागत आहे. ज्यांना तुम्ही तुमच्या गावात बोलावता त्यांची व्यवस्था नीट करा. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. मोहन जोशी, सुरेश खरे यांचीही गैरसोय झाली”.

नुकत्याच झालेल्या नाट्यपरिषद निवडणुकीत त्या निवडून ही आल्या आहेत आणि त्यांच्यासोबत अशी गैरसोय हे फारच दुर्दैवी आहे . सविता मालपेकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे कलाकाराला किंमत नाही तिथे अशी नाट्यसंमेलन घेऊन काय मिळवले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीदेखील व्हिडीओ  शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. वंदना गुप्ते म्हणाल्या,”मी पुन्हा मुंबईला चालले आहे. मला एकही सभामंडप दिसलं नाही, सापडलं नाही. नाट्यसंमेलनासाठी मी नटून थटून आले होते. पण कार्यक्रमस्थळ न मिळाल्याने मी आता पुन्हा मुंबईला जात आहे”.

शिवाय, संमेलनाचे निमंत्रक तथा परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी विधानपरिषद सदस्य पडी नियुक्ती करण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यामुळे संमेलनाचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे पाहून नाराजी दिसून आली.