Home Maharashtra Special उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने अल्पसंख्याचा महायुती सरकारवर भरोसा: उलेमा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सलीम सारंग यांची ग्वाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने अल्पसंख्याचा महायुती सरकारवर भरोसा: उलेमा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सलीम सारंग यांची ग्वाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने अल्पसंख्याचा महायुती सरकारवर भरोसा: उलेमा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सलीम सारंग यांची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी

अल्पसंख्यांक समाजाला केवळ सोयी सवलतींचे गाजर दाखवत झुलवत ठेवण्याचे काम सर्वच पक्ष आणि सरकारांनी केले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाचे पक्के असल्याची त्यांची ख्याती असून त्याचा अनुभव आपण घेतला असल्याची ग्वाही उलेमा वक्फ बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या पुढाकाराखाली विद्यमान महायुती सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण यापूर्वीच न्यायालयाने मान्य केले असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आतापर्यंत केली गेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने या मागणीची पूर्तता होईल, अशी अपेक्षाही सारंग यांनी व्यक्त केली. या मागणी संदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. या भेटीत पवार यांनी या प्रश्नाची सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजासाठी सातत्याने काम करण्याचा दिलेला शब्द ते खरा करत आहेत, याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. त्यांनी अल्पावधीत जेवढे काम केले आहे तेवढे काम आजवर कोणत्याही सरकारनेही अल्पसंख्याकांसाठी केलेले नाही, अशा शब्दात सारंग यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलामध्ये रु. ५०० कोटींची वाढ करणे, कर्ज हमीमध्ये वाढ करणे, प्रति मदरसा रु. १० लाखांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, वक्फ संस्थांच्या विलंब शुल्क व ऑडिट फी मध्ये कपात करणे, छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊस तातडीने सुरू करण्याचे आदेश देणे, राज्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांतील रिक्त पदे भरण्याचे आदेश देणे, या व अशा अनेक निर्णयांतून दादांनी अल्पसंख्याक समाजाला आशेचा नवा किरण दाखवला आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या सरकारपेक्षाही हे महायुती सरकार अल्पसंख्याक समाजासाठी करत असलेले काम अधिक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद आहे, असे मत सारंग यांनी व्यक्त केले