Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the updraftplus domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/vishwasa/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Vishwa Sahyadri – पाऊल प्रगती चे … नव निर्मिती चे…
Home Blog

अजय बैरागी यांनी त्यांचे नवीनतम पुस्तक “OOPS: TOO MUCH NOISE” चे अनावरण केले

अजय बैरागी यांनी त्यांचे नवीनतम पुस्तक “OOPS: TOO MUCH NOISE” चे अनावरण केले<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

अजय बैरागी यांनी त्यांचे नवीनतम पुस्तक “OOPS: TOO MUCH NOISE” चे अनावरण केले – नकारात्मकतेपासून वर उठून लक्ष केंद्रित करण्यावर एक प्रभावी विचार.

मुंबई, ८ मार्च २०२५ – नोवोटेल मुंबई येथे सुप्रसिद्ध उद्योजक आणि माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व अजय बैरागी यांच्या “OOPS: TOO MUCH NOISE” या पुस्तकाचे भव्य आणि दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्योग, माध्यम, आणि विविध क्षेत्रांतील १०० हून अधिक प्रतिष्ठित नेत्यांनी उपस्थिती लावली, ज्यामुळे हा सोहळा अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरला.

या प्रकाशन सोहळ्याची विशेष शोभा वाढवली सिक्रिबरलीच्या संस्थापक, “The Hanuman’s Diary: Mantras. Meanings. Manifestations.” या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रसिद्ध ट्रेनर रिया गोटे यांनी. रिया गोटे आपल्या लेखन आणि प्रशिक्षण कार्याने अनेकांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या सशक्त विचारांमुळे त्या तरुणाईसाठी एक मार्गदर्शक ठरल्या आहेत. तसेच या सोहळ्याला माध्यम क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व नितीन येलमर यांनीही आपली उपस्थिती दर्शवली. नितीन येलमर यांनी माध्यम क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करत असताना एक सशक्त आणि प्रभावी ओळख निर्माण केली आहे. अंकित जोशी, सीईओ आणि संस्थापक Feather Touch हे देखील उपस्थित होते. या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली.

“OOPS: TOO MUCH NOISE” हे पुस्तक केवळ एक कथा नसून, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जगात अनेकदा निर्माण होणाऱ्या गोंधळात आपली खरी ओळख कशी निर्माण करावी यावर प्रकाश टाकते. स्वतःवरील विश्वास, ध्येयावर असलेली निष्ठा आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपली वाटचाल कशी ठामपणे करावी, यावर हे पुस्तक सखोल मार्गदर्शन करते. अजय बैरागी यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासात आलेल्या अनुभवांच्या आधारावर हे पुस्तक लिहिले आहे, जे अनेकांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने चालताना प्रेरणा देईल.

कार्यक्रमादरम्यान अजय बैरागी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा म्हणजे माझ्या जीवनातील आव्हाने आणि त्यातून शिकलेले महत्त्वाचे धडे. अनेकदा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आवाज, त्यांचे मत आणि टीका आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करू पाहतात. पण हे पुस्तक सांगते की, त्या सगळ्या गोंधळातून स्वतःची वाट कशी शोधायची आणि आपल्या उद्दिष्टांकडे कसे प्रामाणिकपणे वाटचाल करायची. इतरांच्या मतांनी किंवा शब्दांनी तुम्ही कधीही परिभाषित होऊ नका. तुमचे कर्तृत्व आणि दृढनिश्चय हेच तुमच्या यशाचे खरे मोजमाप आहे.”

या कार्यक्रमाची सांगता एका उत्साही आणि प्रेरणादायी चर्चासत्राने झाली, जिथे उपस्थित उद्योगजगताच्या मान्यवरांनी “OOPS: TOO MUCH NOISE” या पुस्तकावर आपली मते मांडली आणि अजय बैरागी यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. हा कार्यक्रम केवळ पुस्तक प्रकाशन नव्हता, तर तो एक विचारमंथनाचा उत्सव होता, जिथे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मविश्वास आणि स्व-ओळखीबद्दल सखोल चर्चा झाली.

“OOPS: TOO MUCH NOISE” हे फक्त एक पुस्तक नाही; ते आत्म-सक्षमीकरण आणि निर्भय प्रामाणिकपणाकडे जाणारी एक चळवळ आहे. त्यांची मुलगी, कार्या अजय बैरागी यांना समर्पित, आणि त्यांच्या कुटुंब आणि त्यांच्या फर्मच्या अपवादात्मक टीमद्वारे समर्थित, हे पुस्तक आता सर्व प्रमुख पुस्तक विक्री केंद्रांमध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या पुस्तकाने निश्चितच अनेकांना स्वतःची खरी ओळख शोधण्याची प्रेरणा मिळेल आणि यशाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा मार्ग सापडेल.

राहुल सोलापूरकर यांनी इतिहासाबाबत बोलणे थांबवावे; मंत्री उदय सामंत यांचा मित्रत्वाचा सल्ला

राहुल सोलापूरकर यांनी इतिहासाबाबत बोलणे थांबवावे; मंत्री उदय सामंत यांचा मित्रत्वाचा सल्ला<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

मुंबई: प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधाने करून नंतर माफी मागणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी इतिहासाबाबत बोलणे थांबवावे, असा मित्रत्वाचा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांना दिला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ही दोन्ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची श्रद्धास्थाने आहेत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करणे आणि नंतर माफी मागणे हे योग्य नाही. राहुल सोलापूरकर यांना त्यांनी केलेल्या विधानाबाबत कोणत्याही पुस्तकात संदर्भ सापडला असेल तर त्याबद्दलची माहिती त्यांनी जाहीर करावी. त्या संदर्भाची सत्यता तपासून ते अयोग्य असल्यास, तो उल्लेख करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर देखील कारवाई व्हायला हवी, असेही सामंत म्हणाले 

सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानाबाबत कोणती कारवाई करायची याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे स्वतः करणार आहेत. सोलापूरकर यांना समज द्यायची की कायदेशीर कारवाई करायची, याचा निर्णय ते घेतील. मात्र, सोलापूरकर हे माझे अनेक वर्षापासून मित्र आहेत. त्यांनी इतिहासावर बोलू नये, असा त्यांना माझा सल्ला आहे, असे सामंत यांनी नमूद केले.

ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांचे वृद्धापकाळने निधन

ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांचे वृद्धापकाळने निधन<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पुणे: प्रतिनिधी 

ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांचे आज पहाटे वृद्धापकाळने निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. ग्रामीण भागाचे चित्रण करणाऱ्या पाचोळा या कादंबरीने त्यांचे नाव साहित्य वर्तुळात व वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यामुळे त्यांना पाचोळाकार या नावाने ओळखले जाऊ लागले. 

लातूर जिल्ह्यातील काटेगाव या अत्यंत मागासलेल्या खेडेगावात शेतकरी कुटुंबात बोराडे यांचा जन्म झाला. चौथीनंतर शिक्षणासाठी ते बार्शी येथे गेले. त्यानंतर सोलापूर आणि औरंगाबाद येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

सन 1957 मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास शेवटपर्यंत सुरू राहिला. अत्यंत सोपे आणि रसाळ भाषेत विशेषतः ग्रामीण भागातील जनजीवन त्यांनी आपल्या लेखनातून मांडले. 

पेरणी, ताळमेळ, मळणी, चाळवण, , बोळवण, वरात, फजितवाडा, खोळंबा, बुरुज, नातीगोती, हेलकावे, फणस आणि कडबा असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. यामध्ये बोराडे यांनी विशेषतः मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील जीवनाचे चित्रण केले आहे.

“मोबाईल कडून मैदानाकडे” साठी “पारस चषक 2025” चे यशस्वी आयोजन

“मोबाईल कडून मैदानाकडे” साठी “पारस चषक 2025” चे यशस्वी आयोजन<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />
Oplus_131072

पारस इलेक्ट्रिकल अँड एंटरप्राईजेस आणि रायझिंग स्टार स्पोर्टस असोसिएशन रावेत यांच्या संयुक्त विद्यमानाने “पारस चषक 2025” चे यशस्वी आयोजन

चिंचवड – रावेत मधील सर्व पिढ्यामध्ये खेळाची रुची वाढावी तसेच मोबाईल कडून मैदानाकडे जावे या हेतूने माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारस इलेक्ट्रिकल अँड एंटरप्राईजस आणि रायझिंग स्टार स्पोर्टस असोसिएशन रावेत यांच्या संयुक्त विद्यमानाने “पारस चषक 2025” चे यशस्वी आयोजन करण्यात आले.

पहिल्या सत्रामध्ये फुल पीच क्रिकेट सामने दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारीला डी मार्ट ग्राउंड रावेत या ठिकाणी घेण्यात आले.

सदर शृंखलेमध्ये 50 ते 60 खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. खेळाडूंनी मोठ्या उत्साहात स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये पाच संघ सहभागी झाले होते.

पारस एलईडी संघास तृतीय विजेतेपद, पारस सोलार संघास द्वितीय विजेतेपद आणि पारस ट्रान्सफॉर्मर संघाने “पारस चषक 2025” जिंकला.

वैयक्तिक पातळीवर ‘मॅन ऑफ द सिरीज’ हा किताब ओमकार मोहिते यांनी मिळाला. ‘बेस्ट फलंदाज, हा किताब अमर वायकर यांना मिळाला. बेस्ट फिल्डर हा किताब तुषार फाळके यांना मिळाला. बेस्ट गोलंदाज हा किताब मनोज सूर्यवंशी यांना मिळाला.

विजेत्या सर्व संघाचे व खेळाडूंचे मोरेश्वरभाऊ भोंडवे आणि पारस इलेक्ट्रिक यांच्याकडून सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पारस इलेक्ट्रिक आणि इंटरप्राईजेचे मालक तुषार फाळके आणि रायझिंग स्टार स्पोर्ट असोसिएशन रावेतचे सेक्रेटरी माननीय अमेय टुमकर तसेच खजिनदार ओमकार मोहिते तसेच सुयोग चव्हाण, अमित गुरव पाटील,उपाध्यक्ष माननीय नरेश गाडगे आणि अध्यक्ष माननीय मदन दळे या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि स्पर्धा सुरळीत पार पाडली. यासाठी सर्व खेळाडूंकडून कडून या सर्वांचे खूप कौतुक करण्यात आले.

पिं.चिं.चेंबर ऑफ कॉमर्सच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त चेंबरची नवीन कार्यकारिणी जाहीर.

पिं.चिं.चेंबर ऑफ कॉमर्सच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त  चेंबरची नवीन कार्यकारिणी जाहीर.<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />
oplus_0

एम.एस.एम.ई. उद्योगांच्या संकटावर मात करण्यासाठी उद्योगक्षेत्र संघटीतपणे लढणार

चिंचवड – आज चेंबरच्या १८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्योजकांची बैठक ‘हॉटेल’ भोला’, एम.आय.डी.सी., चिंचवड, पुणे -१९ येथे संपन्न झाली. चेंबरच्या १७ वर्षातील कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी मांडला. आजपर्यंत एल. बी. टी. कायदा रद्द करणे, माथाडी कायद्यात सुधारणा, जी. एस. टी., प्राप्तीकर कायद्यातील अडचणी सोडवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला, औद्योगिक प्रदर्शने भरवलीत.

आज पिंपरी चिंचवड एमआयडीसीला स्वतंत्र औद्योगिक नगरीचा अध्यादेश ३० वर्षे प्रलंबित पुर्णत्वास नेणेसाठी प्रयत्न करणार. एमआयडीसीच्या जवळच्या चिखली, कुदळवाडी, मोशी परिसरात असंख्य एम. एस.एम.ई. उद्योगांवर झालेली ‘भुईसपाट ‘ वृत्तीचा जाहीर विरोध आणि नाराजी उद्योजकांनी केली. यासाठी एम.आय.डी.सी.तील सर्व संघटना एकत्रीतपणे उद्योगांवर महापालिकेने लादलेले अस्मानी संकटापूर्वी, काही कालावधी आणि संधीची मर्यादा न देता एकप्रकारे ‘हातोडा मारला’ असे दिसते आहे.

चेंबरची कार्यकारिणी सन २०२५ – २६ ते २०२९ – ३० पर्यंत निवडली ती खालीलप्रमाणे :-
१) अध्यक्ष : प्रेमचंद आर. मित्तल २) उपाध्यक्ष : रामदास माने
३) सचिव : विनोद शिवनारायण बन्सल
४) खजिनदार : प्रशांत रंगनाथ गोडगे-पाटील
५) कार्यकारिणी सदस्य : (१) सुरेश वाढोकार, (२) व्ही.एस. काळभोर, (३) पी.के. जॉर्ज, (४) प्रदीप वैद्य (५) विक्रम सावंत, (६) राजकुमार अगरवाल (७) सागर शिंदे (८) व्ही.एम. शिंदे, (९) नेलवीन वर्गीस हे होत.

चेंबरच्या पुढील काळात एम.एस.एम.ई. अधिक समृध्द, कायदयाने सक्षम आणि सरकारी औद्योगिक कायदयाबाबत ज्ञान आणि संकटकाळी कायदयाच्या चौकटीत उभे राहणेकामी क्षमता वाढविणेसाठी, संघटीत प्रयत्न करत असे. चेंबरचे नवीन अध्यक्ष, प्रेमचंद मित्तल यांनी उपस्थित उद्योजक समुदायास मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव विनोद शिवनारायण बंसल यांनी केले, आभार प्रदर्शन नंदु शिंदे यांनी मानले.

आपल्या देशाचा महान इतिहास सतत प्रेरणादायी – सचिन अडागळे

आपल्या देशाचा महान इतिहास सतत प्रेरणादायी – सचिन अडागळे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पिंपरी – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुणे महा मेट्रोचे अभियंता सचिन अडागळे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ नगरकर, होंडा टू व्हीलर प्रायव्हेट लिमिटेड चे वरिष्ठ अधिकारी आनंद कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन अडागळे उपस्थित होते.

यावेळी सकाळी विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन करून चापेकर चौकातील चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर प्रशालेत उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता व क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

“देश हा देव असे माझा” हे गौरव गीत इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थिनींनी सादर केले. त्यानंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्य गीत सादर करण्यात आले. सामूहिक कवायत तसेच साधन कवायत विद्यार्थ्यांनी सादर केली. इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी मानवी मनोर्‍यांचे सादरीकरण केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत ‘स्वागताचा हा सोहळा ‘ हे स्वागत गीत इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थ्यांनीनी स्वागत गीतातून केले. माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर प्रशालेतील उपशिक्षिका कयापक मॅडम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला व प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला व प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

इयत्ता चौथी ते अकरावी मधील आरोही कोल्हे, राधिका कोल्हे सार्थकी जाधव अनुजा पिटलेवाढ या विद्यार्थ्यांथीनींनी मराठीत प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली तर इयत्ता सहावीतील हर्षवर्धन गाडेकर व क्रिश मल्हाह या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त प्रशालेतील उपशिक्षिका शुभांगी बडवे यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञेचे वाचन करून घेतले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये बाल विभागातील विद्यार्थ्यांनी तीन रंग झेंड्याचे व क्रांतिवीर चापेकर बंधूंची प्रतिज्ञा सादर केली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी जयस्तुते जयस्तुते,ओ देश मेरे, देश रंगीला रंगीला, फिर भी दिल है हिंदुस्तानी, जिगरा है जिगरा , सुनो गौर से दुनिया वालो तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मै भारत का रहने वाला हू, सुनो गौर से दुनियावालो, आपले सण वआपली संस्कृती ही देशभक्तीपर गीते बहारदार नृत्यातून सादर केली.

भारतीय संस्कृतीचे अंधानुकरण ही मूक अभिनय नाटिका सादर करण्यात आली.

इयत्ता सहावीतील हर्षवर्धन गाडेकर इयत्ता सातवीतील प्राची चव्हाण तसेच इयत्ता अकरावीतील महेश पवार व इयत्ता बारावीतील स्वरूपा कलाटे या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

सचिन अडागळे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, चारित्र्य, एकता ह्या राज्यघटनेतील शब्दांचा अर्थ समजावून सांगितला, क्रांतिकारकांनी आपला देश स्वतंत्र केला पण त्यापुढे काम करण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या देशाचा इतिहास मोठा आहे त्यासाठी थोर महापुरुषांची व क्रांतीकारकांची चरित्रे वाचा याविषयी मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.नंतर आनंद कांबळे यांनी आपली संस्कृती महान आहे ती जपून ठेवा उत्तम प्रगती करा, अभ्यास करा, शाळेचे व देशाचे नाव मोठे करा याविषयी मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ नगरकर सर यांनी विद्यार्थ्यांना निर्व्यसनी राहून कुठल्याही व्यसनाला बळी पडू नये, मोठे व्यक्तिमत्व म्हणून आपण जीवन जगावे व जीवनात प्रामाणिकपणा जोपासावा व वैज्ञानिक प्रयोग करायला शिका याविषयी मार्गदर्शन करून उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्तवनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील उपशिक्षक सुधाकर हांडे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.

‘रा. स्व. संघ जनकल्याण समिती’तर्फे आरोग्यविषयक जागृती मोहीम

‘रा. स्व. संघ जनकल्याण समिती’तर्फे आरोग्यविषयक जागृती मोहीम<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पुणे –
‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन दौड़’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेवा भवन दौड़’चा प्रारंभ रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता होईल. या उपक्रमापासून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’च्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचाही प्रारंभ होणार आहे.

‘जनकल्याण समिती’तर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे आणि ‘सेवा भवन’ प्रकल्पाचे कार्यवाह पलाश देवळणकर यांनी ही माहिती दिली. ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा भवन दौड़’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भवन’ हा सेवा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पाच्या वतीने ‘सेवा भवन दौड़’ होत असून कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून त्याचा प्रारंभ होईल.

या ‘दौड़’चे पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे दोन टप्पे आहेत. या शिवाय ‘चॅरिटी रन’ हा उपक्रमही केला जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, प. महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा भवन दौड़’चा प्रारंभ होईल.

‘जनकल्याण समिती’तर्फे आरोग्यविषयक जागृती मोहीम सुरू केली जात असून या मोहिमेचा प्रारंभ ‘सेवा भवन दौड़’ या उपक्रमापासून केला जाणार आहे. या मोहिमेत प्रामुख्याने तज्ज्ञ डॉक्टरांची आरोग्यविषयक व्याख्याने, विविध विषयांवर चर्चासत्र, आरोग्य शिबिरे, जिज्ञासूंचे शंका-समाधान, महिलांसाठी संवादसत्र, योग, स्वास्थ्य, जीवनशैली याबाबतचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन ‘जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भवन’मध्ये केले जाणार आहे.

‘सेवा भवन’ या प्रकल्पात अल्प दरात डायलिसिसची सुविधा आहे. पुण्यात उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची निवास, भोजन आदी व्यवस्थाही अल्प शुल्कात केली जाते. याशिवाय निःशुल्क स्वास्थ सल्ला आणि समुपदेशन केंद्र चालवले जाते. किडनी आजारासंबंधीची जनजागृती आणि ‘सेवा भवन’ प्रकल्पाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा भवन दौड़’ आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमामध्ये १८ वर्षांवरील महिला आणि पुरुषांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी नोंदणी आवश्यक असून ८२७५३९६३९७ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येईल.

जर्मनीमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी – डॉ. क्रिस्टीना रथ

जर्मनीमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी – डॉ. क्रिस्टीना रथ<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

पीसीयू मध्ये “एक्सप्लोर जर्मनी २०२५” चे यशस्वी आयोजन

पिंपरी, पुणे (दि. १ फेब्रुवारी २०२५) जर्मनीमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगार वाढीसाठी आगामी काळात आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मन भाषा अवगत करावी आणि जर्मनीमधील विद्यापीठांमधून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन स्वतःचे करिअर घडवावे असे मार्गदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. क्रिस्टीना रथ यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मध्ये “एक्सप्लोर जर्मनी २०२५” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जर्मनी संस्कृती, भाषाचा उत्सव साजरा केला.
यावेळी फर्ग्युसन सेंटर फॉर लँग्वेजच्या संचालक डॉ. सरिता केळकर, जीईडीयुचे कंट्री हेड कुबेर कपूर, दिल्ली दुतावासातील अधिकारी शरयू जोरकर, विद्यार्थिनी दक्षा ओक आदी उपस्थित होते.
पीसीयुच्या कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी यांनी सांगितले की, खुल्या आर्थिक धोरणामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा आणि इंग्रजी शिवाय ज्या देशात आपण शिक्षण घेऊ इच्छित आहोत, त्या देशातील भाषा शिकणे देखील आवश्यक आहे. आगामी काळात वाहन उद्योग क्षेत्रात जर्मनी सारख्या प्रगतिशील राष्ट्रात मोठ्या संधी तयार होणार आहेत. त्यासाठी पीसीयू च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. नवीन भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.
डॉ. सरिता केळकर यांनी जर्मनी आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक समानतेबद्दल माहिती दिली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
———————————–

प्रा.भूषण ओझर्डे यांचे व्याख्यान ए.एस.एम कॉलेज येथे मोठ्या उत्साहात संपन्न

प्रा.भूषण ओझर्डे यांचे व्याख्यान ए.एस.एम कॉलेज येथे मोठ्या उत्साहात संपन्न<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />
Oplus_0

चिंचवड – पूर्णानगर येथे बारावीनंतर करियरच्या कोणत्या दिशा आहेत, त्याची कशी तयारी संदर्भात ओझर्डे इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा.भूषण ओझर्डे यांचे व्याख्यान ए.एस.एम कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथील बारावीच्या फेरवेल कार्यक्रमात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

सर्व विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता असते. मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांतानुसार अनेक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते ती ओळखून त्यामध्ये विचार करून करिअर केल्यास करिअरला व्यवस्थित दिशा मिळते, ओझर्डे इन्स्टिट्यूट मधून आज पर्यंत अगदी लहान वयात शेकडो अधिकारी घडले आहेत, असे व्याख्यानामध्ये दाखले देत ओझर्डे इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक भूषण ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

यावेळी ए.एस.एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर व्हि.पी. पवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अपर्णा मोरे व इतर सहकारी उपस्थित होते.

या व्याख्यानाचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थांनी लाभ घेतला. आयुष्याला दिशा देणाऱ्या बारावीच्या या टप्प्यावर या मार्गदर्शन चा लाभ विद्यार्थ्यांना झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

ग्रीनलँड नवीन जिओपॉलिटिकल सीमारेषा

ग्रीनलँड नवीन जिओपॉलिटिकल सीमारेषा<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php</b> on line <b>45</b><br />

– नितिन येलमार

▪️जसे बर्फ वितळत आहे आणि जग पाहत आहे, तसाच ग्रीनलँडचा प्रवास एक कथा असेल जी अनुसरण करण्यायोग्य आहे—एक कथा जी आपल्या काळातील कॉम्प्लेक्सीटी आणि कॉन्ट्रॅडिकशनचे रिफ्लेकशन असेल
.

ग्रीनलँड—एक दुर्गम आणि कमी लोकसंख्यावाले क्षेत्र—जागतिक चर्चेचा अनपेक्षित केंद्रबिंदू बनला आहे, जो बदलत्या शक्तीच्या गती, हवामान बदल आणि आर्थिक समायोजनांनी पुन्हा अधिक आकार घेत आहे. डोनाल्ड ट्रम्पने २०१९ मध्ये अमेरिकेने ग्रीनलँड खरेदी करण्याची केलेली शिफारस पुन्हा एकदा खरेदी, संसाधनांच्या मालकी आणि आर्कटिकच्या भविष्याविषयी चर्चा सुरू केली आहे. तथापि, मुख्य प्रस्तावांच्या नाटकां मागे एक गहन कथा आहे: ग्रीनलँडची महत्त्वता पर्यावरणीय परिवर्तन, जिओपॉलिटिकल स्पर्धा आणि सोशल विकास

ग्रीनलँड हा डेनमार्कचा स्वायत्त प्रदेश, आर्कटिकमध्ये अद्वितीय स्थान व्यापतो. उत्तरी अमेरिके आणि युरोपच्या दरम्यानचा त्याचे स्थान आणि दुर्मिळ खनिजे, तेल आणि वायू यांसारख्या अजूनही अज्ञात नैसर्गिक संसाधनांचा त्याचा विशाल साठा, त्यास जागतिक गणितात एक प्रमुख आकर्षण बनवतो. वितळणारे बर्फाचे काप—हवामान बदलाचा एक दुर्दैवी परिणाम—नवीन शिपिंग मार्ग आणि पूर्वी बर्फाखाली दफन झालेला संसाधनांपर्यंत प्रवेश मिळत आहे, ज्यामुळे ग्रीनलँडच्या आकर्षणात वाढ झाली आहे.

तथापि, ग्रीनलँडचे महत्त्व केवळ आर्थिक संभाव्यतेच्या पलिकडे आहे. हे नाटोच्या आर्कटिक धोरणाचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि येथे थुले एयर बेस आहे, जो अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या जगात आर्कटिक प्रदेश अधिकाधिक स्पर्धात्मक होत आहेत, ग्रीनलँडच्या पश्चिमी आघाड्यांसाठी महत्त्व वाढले आहे.

▪️शासन आणि स्वायत्तता: संतुलन

ग्रीनलँडच्या राजकारणाच्या भविष्यात तीव्र चर्चा सुरू राहणार आहे. डेनमार्कच्या स्वायत्ततेखाली त्याला महत्त्वपूर्ण स्वायत्तता आहे, ज्यात त्याच्या नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण समाविष्ट आहे, तरीदेखील त्याच्या ५६,००० रहिवाशांमध्ये पूर्ण स्वतंत्रतेच्या मागण्या वाढत आहेत. या समस्येचा मुख्य मुद्दा म्हणजे आत्मनिर्णय आणि आर्थिक सस्टेनिबिलेटी यामध्ये संतुलन साधणे आहे.

सध्या, ग्रीनलँड डेनमार्ककडून मिळणाऱ्या सबसिडीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, जे त्यांच्या बजेटच्या जवळजवळ दोन तृतीयांश आहे. स्वतंत्रतेसाठी आर्थिक विविधीकरण आणि पायाभूत विकास आवश्यक आहे, ज्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि भागीदारी आवश्यक आहे. त्याच वेळी, ग्रीनलँडच्या नेतृत्वाला बाह्य दबाव, विशेषतः आर्कटिकमध्ये स्थान मिळवू इच्छिणाऱ्या जागतिक शक्तींमधून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.

▪️हवामान बदल: एक संधी आणि एक धोका

ग्रीनलँडच्या बर्फाच्या थराचे जलद वितळणे हवामान संकटाचे रीमाईडंर आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे घटनाक्रम समुद्राच्या पातळीत मोठी वाढ करण्यास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे जागतिक किनारी शहरांना धोका निर्माण होतो. तथापि, विरोधाभासाने, या पर्यावरणीय आपत्तीकडे ग्रीनलँडसाठी नवीन आर्थिक संधी देखील निर्माण होत आहे.

वितळणारे बर्फ मौल्यवान खनिज साठे उघडून टाकत आहेत आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने काढण्यास सक्षम बनवित आहे. याशिवाय, नॉर्थवेस्ट पासेजसारखे नवीन शिपिंग मार्ग ग्रीनलँडला जागतिक व्यापारात एक महत्वपूर्ण नोड म्हणून स्थान मिळवू शकतात. तथापि, या विकासाच्या पर्यावरणीय खर्चाचे परिणाम गहन आहेत, ज्यामुळे आर्थिक विकास आणि पर्यावरणीय संरक्षण यामध्ये संतुलन साधण्याबाबत नैतिक प्रश्न उपस्थित होतात.

▪️आर्कटिकमधील जिओपॉलिटिक्स : नवीन मोठा खेळ

आर्कटिक वेगाने जिओपॉलिटिकल स्पर्धेचे स्थान बनत आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि युरोपियन युनियन या क्षेत्रामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. ग्रीनलँडसाठी, याचा अर्थ जटिल संबंध आणि आकर्षणचे जाळे पार करणे आहे.

चीनच्या आर्कटिक महत्वाकांक्षा, उदाहरणार्थ, वॉशिंग्टनमध्ये चिंतेच्या लाटेचा कारण बनला आहे. बीजिंगने बेल्ट अँड रोड उपक्रमांतर्गत ग्रीनलँडमधील खाण प्रकल्पांमध्ये आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे आक्रमणाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेने चीनच्या प्रभावाचा संतुलन साधण्यासाठी कूटनीतिक प्रयत्न आणि आर्थिक मदतिचे लालच दिले आहे. त्यामुळे, ग्रीनलँड एक व्यापक आर्कटिक स्पर्धेत एक प्रमुख खेळाडू बनला आहे.

▪️सामाजिक आणि आर्थिक बाजू

जागतिक चर्चांच्या केंद्रस्थानी ग्रीनलँडच्या लोकांचा समावेश आहे. स्थानिक लोकसंख्या, मुख्यतः प्राथमिक गरजा, उच्च बेरोजगारी, मर्यादित आरोग्यसेवा आणि पारंपरिक जीवनशैलीच्या ह्रासासारख्या अद्वितीय आव्हानांचा सामना करत आहे. हवामान बदल आणि जागतिक लक्ष यामुळे या समस्यां तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विस्थापन होऊ शकते.

तथापि, आशेचा एक भाग देखील आहे. सस्टेनबल विकास, इको-पर्यटन, आणि जबाबदार संसाधन व्यवस्थापन आर्थिक विकासासाठी मार्ग प्रदान करू शकतात, तर ग्रीनलँडच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, ग्रीनलँडच्या लोकांना कोणत्याही विकासात्मक प्रयत्नांचा प्राथमिक लाभार्थी सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

▪️ग्लोबल ऑर्डर मध्ये ग्रीनलँडची भूमिका

ग्रीनलँडचा जिओपॉलिटिकल हॉटस्पॉट म्हणून उदय हा समकालीन जागतिक आव्हानांच्या परस्परसंवादी स्वरूपाचे संकेत देतो. त्यांचे भविष्य कसे आकार घेते, हे त्यांचे नेतृत्व, आंतरराष्ट्रीय समुदाय, आणि लोकांनी केलेल्या निवडींवर अवलंबून असेल.

नीतिनिर्मात्यांसाठी आणि निरीक्षकांसाठी, ग्रीनलँड आजच्या जगातील व्यापक दुविधांचा अंदाज देत आहे. हे विकास आणि सस्टेनब्लीटी, स्वायत्तता आणि परस्परावलंबन, आणि राष्ट्रीय इंटरेस्ट आणि जागतिक जबाबदारी यामध्ये संतुलन साधण्याच्या प्रकरणांमध्ये एक केस स्टडी आहे.

जसे बर्फ वितळत आहे आणि जग पाहत आहे, तसाच ग्रीनलँडचा प्रवास एक कथा असेल जी अनुसरण करण्यायोग्य आहे—एक कथा जी आपल्या काळातील कॉम्प्लेक्सीटी आणि कॉन्ट्रॅडिकशनचे रिफ्लेकशन असेल.